लक्ष्मण तुकाराम जाधव

लक्ष्मण तुकाराम जाधव

रमाई आवास योजना (नागरी) मी, लक्ष्मण तुकाराम जाधव वय 60 वर्षे, राहणार नांद्राकोळी ता.जि. बुलडाणा. मी माझ्या घराबद्दल यशोगाथा लिहितो की, माझा शेती व्यवसाय असून मी अल्पभूधारक आहे. माझ्याकडे कोरडवाहू तीन एकर शेती असून त्यावरच माझ्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालतो. माझी मुले उदरनिर्वाहासाठी बाहेर गावी राहतात. माझे कुडाचे घर होते, त्यामुळे दरवर्षी ऊन, वारा व पावसाचा खूप त्रास सहन करावा लागत होता. मला कधी स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की, माझे घराचे स्वप्न पूर्ण होईल. मी दरवर्षी घरकुलासाठी अर्ज करायचो परंतु दरवेळेस माझा नंबर लागायचा नाही. मी हताश, निराश व्हायचो. सर्व सरकारी कार्यालयाच्या चकरा मारायचो. माझे काम सोडून मजुरी बुडवून मला सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागायच्या.

अशा वेळी मला समाज कल्याण कार्यालयामार्फत रमाई आवास योजनेबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार मी, 2018 -19 मध्ये रमाई घरकुल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर केला व ग्रामपंचायत कार्यालय नांद्राकोळी येथे कागदपत्रे सादर केली. त्यानुसार माझे नाव पात्र मंजूर यादीत आल्याने मला व माझ्या कुटुंबियांच्या सदस्यांना खूप आनंद झाला. मला माझे घराचे स्वप्न पूर्ण होताना दिसू लागले. त्यानंतर घराचे काम सुरू होऊन माझे घरकुल पूर्ण झाले.आता मला माझ्या घरकुलात राहत असताना ऊन, वारा, पाऊस यापासून माझ्या कुटुंबाचे संरक्षण होऊ लागले त्यामुळे माझ्या घरातील वातावरण आनंदित राहू लागले. करिता मला या शासकीय योजना योजनेचा खूप फायदा झाला असून, मी शासनाचा खूप खूप आभारी आहे.

अर्चना भानुदास कळासरे

अर्चना भानुदास कळासरे

मी, अर्चना भानुदास कळासरे, वय 32 वर्षे, राहणार लोणार ता. लोणार जि. बुलडाणा. मी माझ्या घराबद्दल यशोगाथा लिहिते की, मी एक अपंग महिला असून भूमिहीन आहे व लोकांच्या येथे मजुरी करते. माझ्याकडे तीन बकऱ्या असून, त्यावरच माझे कुटुंबाचे उदरनिर्वाह चालतो. माझी मुले एक मुलगा व मुलगी लहान आहेत. माझे घर दगड - मातीचे होते त्यामुळे दरवर्षी ऊन, वारा व पावसाचा खूप त्रास सहन करावा लागत होता. मला कधी स्वप्नात सुद्धा वाटले वाटत नव्हते की, माझे घराचे स्वप्न पूर्ण होईल. मी दरवर्षी घरकुलासाठी अर्ज करायचे परंतु दरवेळेस माझा नंबर लागायचा नाही. मी हाताश निराश व्हायचे सर्व सरकारी कार्यालयाच्या चकरा मारायचे. माझे काम सोडून मजुरी बुडवून मला सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागायच्या.

त्यावेळी मला समाज कल्याण कार्यालयामार्फत रमाई आवास योजनेबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार मी 2017 - 18 मध्ये रमाई घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केला व नगरपालिका लोणार येथे कागदपत्र सादर केली. त्यानुसार माझे नाव पात्र मंजूर यादीत आल्याने मला व माझ्या कुटुंबातील सदस्यांना खूप आनंद झाला. मला माझ्या घराचे स्वप्न पूर्ण होताना दिसू लागले. त्यानंतर घराचे काम सुरू होऊन माझे घरकुल पूर्ण झाले. आता मला माझ्या घरकुलात राहत असताना ऊन, वारा व पाऊस यापासून माझ्या कुटुंबाचे संरक्षण होऊ लागले. त्यामुळे माझ्या घरातील वातावरण आनंदीत राहू लागले. करिता मला या शासकीय योजनेचा खूप फायदा झाला असून, मी शासनाची खूप खूप आभारी आहे.

हिमांशू अशोक गायकवाड

हिमांशू अशोक गायकवाड

नमस्कार, मी हिमांशू अशोक गायकवाड, शिक्षण एम.ए. अर्थशास्त्र, मी राहणार दुसरबीड ता. सिंदखेड राजा जि. बुलडाणा येथील आहे. माझे शिक्षण बुलडाणा येथील जिजामाता महाविद्यालयात झाले असून, मला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2018 ते 2020 या कालखंडात भेटलेली असून, या योजनेमुळे माझे उच्च शिक्षण पूर्ण होण्यास मदत झाली आहे. एका खेडेगावातून जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन उच्च शिक्षण घेणे खूप अवघड जाते. खेडेगावातील माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तितकीशी पोषक नसल्याने मला पदवी नंतरचे शिक्षण पूर्ण करता येणार नाही असे वाटले, पण स्वाधार योजनेमुळे मला आर्थिक सहाय्य मिळाल्याने मला बुलडाणा येथे राहता येऊन शिक्षण पूर्ण करता आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या योजनेमुळे उच्च शिक्षण घेऊन आपल्या व आपल्या कुटुंबाची जडणघडण करण्यास खूप मदत होईल. ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक कारणांमुळे आपले शिक्षण मध्येच सोडावे लागते त्यांच्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे. एक स्फूर्तीज्योत होऊ शकते. त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी या योजनेचा मोठा मोलाचा वाटा ठरतो. 

विलास देवमन शिंगणे

विलास देवमन शिंगणे

मी, विलास देवमन शिंगणे, मुखेडगाव, ता.देऊळगाव राजा, जि. बुलडाणा येथील रहिवाशी असून, घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे बाहेरगावी शिक्षण घेणे खूप कठीण झाले होते. परंतु सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळाल्यामुळे शहरासारख्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी खूप मोठी मदत झाली.यापुढे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी या संधीचा फायदा घेऊन शिक्षण हे सोयीस्कर होईल.

मला या योजने अंतर्गत खूप मोठी मदत झाल्यामुळे मी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा खूप आभारी आहे.